अष्टविनायक नगर मधील रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी..* आ. खोतकर यांनी दखल घेऊन केली तात्काळ कामाला सुरुवात.

अष्टविनायक नगर मधील रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी..आ. खोतकर यांनी दखल घेऊन केली तात्काळ कामाला सुरुवात.



जालना शहरातील राजूर रोड वरील अनेक घरे असलेले अष्टविनायक नगर हे नव्याने अस्तित्वात आलेली वस्ती असून या वस्तीचा मुख्य रस्त्या पासून वसाहतीत जाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता.
मुख्य रस्त्यापासून अष्टविनायक नगर पर्यंत जाण्यासाठी वृद्ध, बालक व नागरिकांना मोठे कष्ट करावे लागत होते. रस्ताच नसल्यामुळे येण्याजाण्यास दिवसा व रात्री खूप अडचनींचा सामना करावा लागत होता, तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. 

 त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांची भेट घेवुन आमचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली, त्यामुळे आमदार खोतकर यांनी नागरिकांच्या समस्येची तात्काळ दखल घेऊन लगेच संबंधित यंत्रनेला कमी लावून आज स्वतः अधिकारी, पदाधिकारी, व यंत्रनेला सोबत घेऊन वसाहतीत प्रवेश केला व स्वतः च्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, यावेळी परिसरातील नागरिकांनी पुष्पहार घालून आमदार खोतकर यांचा सत्कार केला व अनेक वर्षांपासून त्रास असलेल्या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरु केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले ,विभाग प्रमुख मनोज लाखोले ,दिपक राठोड ,शिवसिंग तिलवारवाले, सुरेश वाढेकर, माने, शिंदे यांच्यासह जालना शहर महापालिकाचे अधिकारी श्री सय्यद सऊद व इतर कर्मचारी यांचेसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या कडून कडवंची येथील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी केली. 

खालील यूट्युब चॅनेल लिंक वर क्लिक करुन बातमी पहा.

https://youtu.be/ySU-z74L60Y?si=WH1JRPbZrKvFx7xV 

टिप्पण्या