लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने पाडण्याची भूमीका घेतली होती. त्याचा थेट फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला होता. त्याची सर्वाधिक झळ ही मराठवाड्यात बसली होती. आता विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत समाजाने उमेदवार रिंगणात उतरवायचे की पुन्हा पाडण्याची भूमीका घ्यायची याबाबत निर्णय होणार आहे. मराठा समाजाकडून निवडणूक लढण्यासाठी जवळपास 800 जण इच्छुक आहेत. त्यांनी तसे अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केले आहेत. या 800 जणांना बैठकीसाठी अंतरवाली सराटी इथे बोलवण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यत आहे.प्रत्यक्ष निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय 20 ऑक्टोबरच्या समाजाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्या आधी ही सर्व तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे काय निर्णय घेतात यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. लोकसभेला जरांगे यांनी थेट पाडण्याची भूमीका घेतली होती. त्याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसला होता. शिवाय भाजपचे उमेदवार पाडा असे विधान ही जरांगे यांनी केले होते. शिवाय मोदी शाह यांचे गणित बघिडवणार असेही वक्तव्य जरांगे यांनी या आधी केले होते. त्यामुळे मराठा समाजाची पुढची भूमीका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा